Share

विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल; किरीट सोमय्यांचे ट्वीट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपाने (bjp) दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीवर काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतल्यानंतर रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपचे ५ तर महाविकासाआघाडीचे (Mahavikasaaghadi) ५ उमेदवार विजयी झालेत. मात्र काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या ट्विटमध्ये म्हणालेत कि, विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा माफिया सरकारचे दिवस भरले आहेत असे देखील सोमय्या म्हणालेत. तसेच भाजपच्या या विजयानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रणनीती राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील यशस्वी ठरली आहे.

 

 

दरम्यान, या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे (Ram Shinde), श्रीकांत भारतीय(Shrikant Bharatiya), उमा खापरे(Uma Khapre), प्रवीण दरेकर(Praveen Darekar) आणि प्रसाद लाड(Prasad Lad) विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमश्या पाडवी (Amashya Padvi), राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) आणि एकनाथ खडसे(Eknath Khadse) तर काँग्रेसचे भाई जगताप (bhai Jagtap) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!