🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (८ जून) औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. याच मैदानात गेल्या महिन्यात राज ठाकरेंनी गर्जना केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या या सभेकडे लागल्या आहेत होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामकरणावर मोठे वक्तव्य केले. यावरूनच मनसे नेते अमित ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
“छत्रपती संभाजी महाराज टकमक टोकावर घेऊन जातील हे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या साथीने सत्ता टिकवल्यानंतर हिंदुत्व सोडल्यावर बोलतील हे यांना का वाटू लागलं?”, असा सवाल अमित ठाकरे यांनी ट्वीट करत केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज टकमक टोकावर घेऊन जातील हे राष्ट्रवादी, काँग्रेस च्या साथीने सत्ता टिकवल्या नंतर हिंदुत्व सोडल्यावर बोलतील हे यांना का वाटू लागलं?#संभाजीनगर #नामकरण #यूटर्न
— अमित ठाकरे -पर्व (@Amitspeak19) June 8, 2022
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो. मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. संभाजीनगर नामकरण हे वचन माझ्या वडिलांनी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहे. त्याचा विसर पडणे शक्य नाही. नामकरण मी करेन तेंव्हा छत्रपती संभाजीराजे यांना अभिमान वाटेल असे शहर मी घडवुन दाखवेन.”
महत्वाच्या बातम्या:
- “म्हटलं होतं ना, संभाजी महाराजांचा पुतळा स्टेज वर बसवतील पण…”, शालिनी ठाकरेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- “रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
- “गोपीनाथ मुंडेंनी मागणी करताच बाळासाहेबांनी…” ; उद्धव ठाकरेंनी करुन दिली भाजपला आठवण!
- “भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे…”, मोहम्मद पैगंबरांच्या अवमानावरून उद्धव ठाकरेंनी सुनावले
- “निवडणुका आल्या की धर्माची अफूची गोळी द्यायची ही भाजपची थेरं” ; उद्धव ठाकरे यांचा जोरदार घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
