🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी जिंकून त्यांचा पहिला कर्णधार शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्याचे अनेक तज्ञांकडून सांगितले जात आहे. असाच काहीसा विश्वास पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही व्यक्त केला आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केल्यानंतर अख्तरने राजस्थान रॉयल्सला शेन वॉर्नला संस्मरणीय श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अंतिम सामना खेळला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे कर्णधार म्हणून कधीही संधी न मिळालेल्या महान खेळाडू शेन वॉर्नने याआधीच राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या हंगामात कर्णधार म्हणून जेतेपद मिळवून दिले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच या ज्येष्ठाचे निधन झाले.
राजस्थान फ्रँचायझी त्यांच्या आयपीएल २०२२ च्या मोहिमेद्वारे ‘फर्स्ट रॉयल’ला श्रद्धांजली अर्पण करत आहे. वॉर्नच्या सन्मानार्थ आयपीएल ट्रॉफीही जिंकण्याची तीव्र भावना संघामध्ये आहे. पहिल्या सत्रातील विजेतेपदाचा भाग असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या अनेक खेळाडूंनाही आज होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
शोएब अख्तर म्हणाला, एका संघाने (राजस्थान) १४ वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेन वॉर्नच्या स्मरणार्थ, मला आशा आहे की राजस्थान गुजरातला हरवेल. शेन वॉर्नसाठी राजस्थानच हा सामना जिंकेल असं माझं हृदय म्हणतं. १४ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, मी आधी म्हटल्याप्रमाणे, मला नेहमी नवीन संघांपैकी एक जिंकायचा होता कारण ते खूप चांगले खेळले. त्यामुळे मी या फायनल मध्ये गुजरातसोबत जाईन.
अंतिम सामन्यातील दोन्ही संघांबाबत शोएब अख्तर म्हणाला की, दोन्ही संघांमध्ये नक्कीच थोडे चिंताग्रस्त वातावरण असेल. तो म्हणाला,
राजस्थान आणि गुजरात दोन्हीही संघ चिंताग्रस्त राहतील. २००८ नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे राजस्थानकडे स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी असेल. त्यामुळे त्यांची आक्रमकता उच्च पातळीवर असेल. त्याचबरोबर गुजरातलाही पहिल्या सत्रात आपली छाप सोडण्याची मोठी संधी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
