🕒 1 min read
मुंबई: देशभरात सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. यावरून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. आता यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हजारो पंडित आजही निर्वासित छावण्यांतच राहत आहेत व भाजपचे सरकार दिल्लीत आले म्हणून त्यांच्या जीवनात फरक पडल्याचे दिसत नाही. पंडितांना घरे सहज देता आली असती. मोदी सरकारला अजून कश्मिरी पंडितांना घरे देता आलेली नाही , तेव्हा त्यांची सुरक्षित घर वापसी तर दूर की बात! असा टोला संजय राऊत (sanjay raut ) यांनी लगावला आहे.
पाकव्याप्त कश्मीर घ्यायचे म्हणजे मोदी सरकारला पाकिस्तानशी थेट युद्ध करावे लागेल. सर्जिकल स्ट्राईकचे लवंगी फटाके फोडून पाकव्याप्त कश्मीर आपल्या ताब्यात येणार नाही. आपण अद्याप पाक तुरुंगातील कुलभूषण जाधव यांना सोडवू शकलेलो नाही. इकडे ऊठसूट “दाऊद दाऊद” असे करायचे, पण त्या दाऊदचा ताबाही आपल्याला मिळविता आलेला नाही. त्यामुळे पाकच्या ताब्यातील कश्मीर घेण्याचा संकल्प कसा पूर्ण होणार? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
तसेच अमेरिकेने सरळ सरळ इराकचा घास घेतला तेव्हा भारताने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. इराकचा सद्दाम हुसेन हा तर भारताचा उघड मित्र होता व कश्मीरच्या प्रश्नी तो सर्वच आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताच्या बाजूने उभा राहिला होता. आता रशिया- युक्रेन युद्धातही आपण पंडित नेहरूंचेच अलिप्तवादाचे धोरण स्वीकारून गप्प बसलो आहोत. त्यामुळे पाकव्याप्त कश्मीर आझाद करण्यासाठी पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याची तयारी मोदी सरकारची आहे काय? पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊन अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच आहे , पण तो पूर्णत्वास कसा नेणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…साकारण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच, पण तो पूर्णत्वास कसा नेणार?”, संजय राऊतांचा सवाल
- IPL 2022: मुंबईच्या पलटनसाठी मोठी बातमी; सूर्या पहिले काही सामने मुकणार!
- IPL 2022 : अरेरे..! स्पर्धेबाहेर गेलेल्या जेसन रॉयला मिळाली जबर शिक्षा!
- शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! शिवसंपर्क अभियानापूर्वी वर्ध्यातील विश्रामगृहात राडा
- “… सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”- रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
