Share

विराट सोबतचे वाद विसरत गंभीरने केले कौतुक; म्हणाला “तो १०० शतक…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिल्लीचे असूनही ३६ आकडा असलेले दोन दिल्लीकर म्हणजेच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सर्वाना माहिती आहे. आयपीएलमध्ये मैदानावर त्याच्यात झालेले भांडण आजही क्रिकेट रसिक विसरू शकले नाही. गौतम गंभीर आता क्रिकेट मधून निवृत्त झाला आहे. तसेच त्याचे विचारही आता वैर असलेल्या खेळाडूंबाबत बदललेले दिसत आहे. गंभीर नुकतेच विराट आणि धोनीचे तोंड भरून कौतुक केले आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकू शकतो, असेही गौतम गंभीरने (gautam gambhir) नमूद केले. त्याचवेळी त्याने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध विराटला त्याचा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार का दिला हेही सांगितले. यावर बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “तु १०० शतके झळकावू शकतो माझ्या मते तो करेल कारण त्याच्यात ती क्षमता आहे. पण, त्याच पहिलं शतक त्याला नेहमी लक्षात राहील. बांगलादेशातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक आणि श्रीलंकेविरुद्धचे पहिले एकदिवसीय शतक मला अजूनही आठवते. त्यामुळे मला त्याचे शतक खास बनवायचे होते. विराट कोहलीने आतापर्यंत जे काही साध्य केले आहे त्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही आणि तो यापुढेही तितकीच चांगली कामगिरी करत राहील.”

गंभीरने याच मुलाखतीत धोनीचेही कौतुक केले होते. जिथे त्याने जर गरज पडली तर सर्वात आधी मी त्याच्यासोबत उभा राहील असे सांगितले. आता त्याने विराट कोहलीचीही प्रशंसा केली आहे. आपल्या कारकिर्दीत बऱ्याच खेळाडूवर टीका शस्त्र उठवणाऱ्या गंभीरचे चांगले वक्तव्य ऐकून क्रिकेट रसिकही हैराण झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!