Share

“सत्तेच्या खुर्चीसाठी किती तिलांजली”, मविआ सरकारवर केशव उपाध्येंचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘आता एमआयएमसोबत शिवसेना बसणार. सत्तेच्या खुर्ची साठी किती तिलांजली. राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचा एकच नारा विकासाच नाव नको, राज्याच भल नको, भाजपला रोखूया सत्तेची फळ चाखूया’, असे उपाध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना ते म्हणाले की,‘शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचारांचे आहेत. जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नाही.’ तसेच एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!