🕒 1 min read
मुंबई: झारखंडने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या सर्वात हास्यास्पद आणि एकतर्फी प्री-क्वार्टर फायनलमध्ये नागालँडवर १००० धावांची लीड घेतली. जी राष्ट्रीय प्रथम-श्रेणी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च लीड ठरली आहे. देशाचा प्रसिद्ध कर्णधार महेंद्रसिंग धोनी तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या झारखंडने एकही नियम मोडला नाही तर पाच दिवस प्रतिस्पर्धीना संधी न देत खेळ भावनेची खिल्ली उडवली आहे.
सौरभ तिवारीच्या (saurabh tiwari) नेतृत्वाखालील झारखंड संघाने सामन्यात एकूण १२९७ धावा केल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंड संघाने पहिल्या डावात ५९१ धावांच्या मोठ्या आघाडीच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केले आहे . झारखंडने पहिल्या डावात २८९ धावांत गुंडाळल्यानंतरही नागालँडला फॉलोऑन दिला नाही. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी झारखंडच्या संघाने २ बाद १३२ धावा करत दुसऱ्या सत्राच्या मध्यावर सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे झारखंडावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
प्लेट गटात अव्वल असलेल्या नागालँडने सर्वाधिक पाच दिवस क्षेत्ररक्षणात घालवले, त्यांनी २९४ षटके गोलंदाजी केली. बंगाल, मुंबई, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, ज्यांनी झारखंडच्या आधी सात उच्चभ्रू गटांमध्ये अव्वल स्थान पटकावले होते, त्यांनी आधीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आगामी आयपीएलनंतर रणजी ट्रॉफीची उपांत्यपूर्व फेरी खेळली जाईल.
महत्वाच्या बातम्या
- चीनच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत उतरायला तयार नाही- संजय राऊत
- “…तर परीक्षा केंद्र कायमचे रद्द केले जाणार”, वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
- IPL 2022: जिमी नीशमने आयपीएलच्या नवीन नियमांबाबत दर्शवली नाराजी; चाहत्यांनी ट्विटरवर झापले
- नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
- देशात पुन्हा कोरोनाची धास्ती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
