Share

“राज्यात सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरु”, फडणवीस आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज (७ मार्च) विविध मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचे दिसून आले. आता त्यांनी कृषी पंपाच्या वीज तोडणीवरून ठाकरे सरकारला चांगलेच निशाण्यावर धरले आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी तत्काळ थांबण्याचे आदेश सरकारने द्यावेत. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाही असे म्हणत फेसबुक लाईव्ह करत त्याने आत्महत्या केली. बीडमध्ये देखील एका शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. अशी उदाहरणे देत राज्यात सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

मागच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की, आम्ही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कट करणार नाही. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्री ऐकत नाहीयेत. ऊर्जामंत्री जाहीर बोलतात की वीज बील भरले नाही तर वीज कट करु. सध्या अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्याने आतम्हत्या केली आहे. मग चर्चा कुठे करायची? असा सवाल करत सरकारने त्वरित वीज तोडणी थांबण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!