🕒 1 min read
मुंबई: मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल (३ मार्च ) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले तर आज भाजपकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.
मुंबईकरांच्या मारेकरी दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा ठाकरे सरकारने राजिनामा घ्यावा अशी मागणी करीत भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहीम राबवली. आहे. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. दरम्यान एकीकडे भाजपकडून अजूनही आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत नवाब मलिक यांच्या कुटुंबियांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहचले आहेत.
मुंबईकरांच्या मारेकरी दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा ठाकरे सरकारने राजिनामा घ्यावा अशी मागणी करीत भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहीम राबवली.@BJP4Maharashtra#Day2 #MaharashtraVidhanbhavan#BudgetSession2022 pic.twitter.com/vGkOhLenJl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 4, 2022
त्यामुळे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच ओबीसी आरक्षणावरूनही भाजपने ठाकरे सरकारला घेरले आहे. त्यामुळे आजचे विधिमंडळ कामकाजही चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
IND vs SL : नवऱ्यासाठीचा ऐतिहासिक दिवस बायकोनं अजून बनवला खास; विराटसाठी अनुष्कानं….!
- State Budget Session : राज्यपालांच्या ‘त्या’ कृत्याचा राज्य मंत्रिमंडळाकडून निषेध; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र
- यूक्रेन – रशियातली चर्चा हस्तांदलोनाने पडली पार, रशियन सरकारी चॅनलचं ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
