Share

Russia-Ukraine war : कीव शहरातून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; केंद्रीय मंत्र्याची माहिती

Published On: 

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. त्यातच भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम राबवली जात आहे. मात्र यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कीव शहरातून मायदेशात निघालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग (Union Minister of State for Civil Aviation General (Retd.) V. K. Singh) यांनी दिली आहे.

गोळीबारातच कर्नाटक विद्यार्थी नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता ही नवीन माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी मोदी सरकारने केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांना पाठवले आहे.

दरम्यान व्ही के सिंग पोलंड येथे असून त्यांनीच ही माहिती दिली आहे. त्यांनी पोलंडमधील गुरुद्वारा सिंग साहिब येथे राहणाऱ्या ८० भारतीय विद्यार्थ्यांचीही भेट घेतली आहे. दरम्यान रशिया-युक्रेन युद्धात कर्नाटकातील नवीन शेखरप्पा आणि पंजाबचा चंदन जिंदाल या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!