Share

State Budget Session : राज्यपालांच्या ‘त्या’ कृत्याचा राज्य मंत्रिमंडळाकडून निषेध; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कालपासून (३ मार्च) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली. मात्र पहिलाच दिवस गोंधळ, घोषणांनी गाजला. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) भाषण देत असताना सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपालांनी अवघ्या दोन मिनिटांत आपले भाषण करून ते सभागृहातून निघून गेले. त्यामुळे राज्यपालांच्या या कृत्याचा अनेक नेत्यांनी निषेध केला. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान राज्यपालांची ही कृती राज्याचा अवमान करणारी असून त्यांच्या या कृतीचा राज्य मंत्रिमंडळाने निषेध करून नापसंती व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच राज्यपालांनी सहकार कायद्यात बदल करणारे विधेयक परत पाठवल्याने हा संघर्ष अधोरेखित झाला आहे.

दरम्यान राज्यपालांच्या या कृत्याचा सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कोश्यारी निषेध व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी तर थेट शीर्षांसन करीत राज्यपालांचा निषेध केला. दरम्यान मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा, यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!