Share

राहुल गांधींच्या टीकेवर पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले,‘जे सभागृहात बसतच…’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आजपासून(१० फेब्रु.)पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना सुरुवात होत असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.

संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली. तद्पश्चात पंतप्रधान मोदींनीही लोकसभेच्या भाषणात काँग्रेसला खोचक टोले लगावले. यासंदर्भात मुलाखतीत बोलत असतांना मोदी म्हणाले की,‘काही विषयांवर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने, संरक्षण मंत्रालयाने भूमिका मांडली असून ज्या विषयांवर गरज पडली, तिथे मी देखील स्पष्टीकरण दिले आहे. परंतु जे ऐकतच नाहीत, जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या वक्तव्यावर मी काय भूमिका मांडणार?’, असा सवाल मोदींनी केला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘हल्ला करण्याची भाषा मला माहिती नाही किंवा माझा तो स्वभावही नाही. पण ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्यांच्या आधारावर सभागृहात मी कोणती बाब सांगितली, तर माध्यमांमध्ये हेडलाई करण्यासाठी हल्ला या शब्दाचा वापर केला जात असेल. पण आम्ही हल्ला करत नाहीत, आम्ही संवाद करतो’, असेही मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!