Share

‘केंद्रातलंही सरकार आम्ही ताब्यात घेऊ’; नवाब मलिकांचा इशारा 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. शवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती यांना पत्र पाठवले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर चांगलाच हल्ला चढवला होता. यावर भाजप नेत्यांनी देखील आता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

अशातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वक्तव्य केलं आहे. राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे, असं वक्तव्यं मलिक यांनी केलं आहे.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, भाजपला वाटतंय की आमच्या सरकारमधील नेते घाबरून बाहेर पडतील. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे परंतु केंद्रातील सरकार आम्ही ताब्यात घेऊ, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!