🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagar Sigh Koshyari) यांच्यात सध्या राजकीय संघर्ष सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतला नाही. त्यावरून राज्यात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोणत्या फाईलवर सही करायची हा अधिकार सर्वस्वी महामहीम राज्यपालांचा असतो. लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्या परंपरांचे पालन राज्यकर्ते करतील. राज्यपालांनी पण केले पाहिजे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हणाले आहेत. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राज्यपालांकडे गेला आहे. त्यावर राज्यपालांच्या स्वाक्षरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत दुरुस्ती करणारा प्रस्ताव सरकारने पाठवला आहे. या प्रस्तावाला भाजपनेही विरोध केला आहे. त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्ही राज्यपालांकडे फाईल पाठवली आहे. काल मी दिवसभर पुणे दौऱ्यावर होतो, रात्री बारामती आणि सकाळी आता सिंधुदुर्गमध्ये, दुपारी रत्नागिरीला असणार आहे. संध्याकाळी मुंबईत गेल्यानंतर त्याची माहिती घेणार आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या हत्येचा कट, यात जयंत पाटील, पोलीस अधिकारीही सामिल’
- सलमान खानला फार्महाऊसवर सर्पदंश; एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु
- “नवाब मलिकांची भूमिका संघासारखी”, प्रकाश आंबेडकरांची टीका
- “मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या सरकारने”, सदाभाऊंचा हल्लाबोल
- ‘शिवसेनाप्रमुख कोण होते, तेही सांगून टाका?’, भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
