Share

राज्यातील दंगलींमागे रझा अकादमीचा हात; नितेश राणेंचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या अफवांचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम धर्मीयांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. या विरोधात रझा अकादमी आक्रमक झाली असून भिवंडीत रझा अकादमीचे अध्यक्ष शकील रजा यांनी भिवंडी बंदचे आवाहन केल्याने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यां मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच औरंगाबाद शहरामध्येही बंद पुकारण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या सर्व हिंसाचार आणि दंगलींमागे ही दहशतवादी संघटना रझा अकादमीचा हात आहे. प्रत्येक वेळी ते व्यत्यय आणतात आणि सर्व नियम मोडतात आणि सरकार बसते आणि पाहते. एकतर सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना संपवावे लागेल. असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान भिवंडी शहरातील दिवाणशाह दर्गा रोड, शास्त्रीनगर कल्याण रोड, शांतीनगर, गैबिनगर, नवीबस्ती, वंजारपाट्टी नाका, मिल्लत नगर , वंजारपट्टी नाका, समदनगर , पटेल कंपाऊंड, फातमानगर, नुरीनगर नगर, अवचित पाडा रोड अशा विविध भागात बंदचा प्रभाव जाणवला असून या भागातील दुकान, आस्थापने बंद ठेवण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!