🕒 1 min read
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून 350 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपावर कर्मचारी ठाम आहेत. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे.
एसटी कर्मचार्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार असंवेदनशील आहे. हे आंदोलन चिघळू नये असं आम्हाला पण वाटतं. पण राज्य सरकार हे केवळ दमळशाहीच्या जोरावर दाबून आणि लोकांवर वेगवेगळी कारवाई करुन हे आंदोलन आणखी चिरडण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन आणखी वाढेल.
चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. काहीना काही दिलासा कर्मचाऱ्यांना राज्याने दिल्या पाहिजेत. इतक्या आत्महत्या झाल्या तरीही राज्य सरकार जाग होणार नसेल तर हे चूकीचं आहे. आम्ही सरकारला पाहिजे तेवढं सहकार्य करु पण सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
एसटी कर्मचार्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार असंवेदनशील आहे आणि सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी!
नागपूर येथे माध्यमांशी साधलेला संवाद..https://t.co/fGwDI6pxvi pic.twitter.com/XXZmVTJ7sj— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पडळकर, सोमय्यांचा सहभाग; मुंबई पोलिसांकडून अटक
- गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
- एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
- पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब
- मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; मुन्ना यादवची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

