मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतरही राज्यभरात कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा कामगारांना आवाहन केलं आहे.
अनिल परब यांनी म्हटलं की, हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू होतोय.. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे, असं परब म्हणाले.
विलिनीकरणाची मागणी एक दोन दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिलेत. महामंडळानं एसटी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. एसटी कामगारांना माझी विनंती आहे की कुणाच्याही भाषणबाजीला बळी पडू नका. नुकसान होऊ देऊ नका, कारण भडकवणारे नेते आपल्याला पगार देणार नाहीत, त्यामुळं कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं आवाहन अनिल परब यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहे का?, असा सवाल अनिल परब यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत
- ‘नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज’, दरेकरांचा टोला
- ‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं सडेतोड उत्तर
- समीर वानखेडेंच्या औरंगाबादेतील आत्याची मलिकांविरोधात तक्रार, एट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

