🕒 1 min read
अहमदनगर : राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यांच्या हत्या होत आहेत. या हत्या, अत्याचार वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
जवळे येथील अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाची वाघ यांनी भेट घेऊन धीर दिला. भाजपच्या वतीने एक लाखांच्या मदतीचा धनादेश त्यांनी कुटूंबियांकडे सूपूर्द केला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. वाघ म्हणाल्या, राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतून अत्याचार झालेल्या महिलांना, मुलींना आर्थिक मदत करण्यात येते. त्याच धर्तीवर अत्याचार व हत्या झालेल्या महिला व मुलींच्या कुटूंबियांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे.
मनैधैर्य योजनेच्या धर्तीवर हत्या झालेल्या मुलीच्या कुटूंबियांना आधार देण्याची योजना आखणे आवश्यक आहे. जवळे येथील पीडितेच्या कटुंंबाला राज्य सरकारने २५ लाखांची मदत द्यावी. पीडितेच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या कोणालाच या प्रकाराबाबत माहिती नाही का? शेजाऱ्यांवर दबाव आहे का? कोणी दहशत निर्माण केली आहे का? अशा शंका वाघ यांनी व्यक्त केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्यांना आहे तिथेच ठेवा, इथे आले तर…’, फडणवीसांचे टीकास्त्र
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप


