🕒 1 min read
मुंबई : दादरा नगर हवेतीतील लोकसभा पोट निवडणुकीसाठीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून त्यामुळे सर्व पक्षनेते पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपाची दादरामध्ये जाहीर सभा झाली. या सभेमदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,’ते मोदींचे नाव घेऊन निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. हे लोक फक्त संधीसाधू आहेत. जेव्हा त्यांना निवडणुका लढायच्या असतात, तेव्हा मोदींची आठवण येते आणि निवडणुका झाल्यावर त्यांना सत्ता दिसू लागते.’ तसेच ‘शिवसेनेकडून महाराष्ट्रात वसुली सरकार चालवलं जात असल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. “शिवसेनेचा मुंबईचा इतिहास पाहा. तिथे ते करत असलेलं काम पाहा. जसं तिथे त्यांचं काम सुरू आहे, वसुली सुरू आहे, ते पाहाता महाराष्ट्रातलं सरकार आता सरकार नसून वसुली सरकार झालं आहे. तीच वसुली ते दादरा-नगर हवेलीत आणू इच्छित आहेत,’ असा आरोपही फडणवीस यांनी केला.
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’ते जिथे आहेत, त्यांना तिथेच ठेवा. ते इथे आले, तर नाव तर महाराष्ट्राचं घेतील, पण काम मोघलांचं करतील.’
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘सुभाष साबणे यांना निवडून देऊन ताळ्यावर नसलेल्या राज्य सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका’
- ‘ट्विटर कोर्ट आहे का?’; क्रांती रेडकरने मलिकांना सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
