🕒 1 min read
पुणे : महापालिकेच्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेस मंजुरी देवून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची चांगलीच गोच्ची केल्याचे स्पष्ट होत आहे. या खेळीमुळे सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देणार्या काँग्रेसने रिव्हर्स गिअर टाकला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना महापालिका निवडणुका महाविकासआघाडीच्या माध्यमातून लढण्याचे संकेत दिले आहे.
राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पक्ष वाढीसाठी काँग्रेस पक्ष राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची गर्जना प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सर्व प्रथम केली होती. पटोले यांच्या या गर्जनेमुळे महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही पटोले यांच्या सूरात सूर मिसळत स्वबळाचा नारा देण्यास सुरूवात केली होती.
दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडूनही स्वबळाच्या घोषणा झाल्या. राज्यात सरकार असल्याने महापालिका निवडणुकीसाठी आपलेच नगरसेवक जास्त निवडूण यावेत, यासाठी भाजपने आणलेली चार सदस्यीय प्रभागरचना मोडीत काढून एक सदस्यीय वॉर्ड किंवा दोन सदस्यीय प्रभाग करण्याचे संकेत दिले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार- अजित पवार
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ

