🕒 1 min read
मुंबई : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांनी मोठे प्रयत्न केले मात्र भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत महाराष्ट्र एकीकरण समिती सह सर्वांना अस्मान दाखवले.
बेळगाव महापालिका स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीची अबाधित असणारी सत्ता या निकालानंतर संपुष्टात आली. भाजपने ३५ जागा मिळवत प्रथमच महापालिकेवर प्रथमच आपला झेंडा लावला आहे. तर बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडवून आणला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला होता.
त्यावर बेळगावात भगवा झेंडाच फडकला आहे असा दावा भाजपने केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता ट्वीट भाजपला खुले आव्हान दिले आहे. महाराष्ट्र भाजपा कडून दोन अपेक्षा आहेत. एक म्हणजे बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा आणि दुसरी बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा,आहे मंजूर? अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच.’ अशी मागणी आता राऊत यांनी ट्वीट करून केली आहे.
महाराष्ट्र भाजपा कडून दोन अपेक्षा आहेत:
1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा
2)बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा..
आहे मंजूर?
अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच!— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागात आरोग्यव्यवस्था सुदृढ असती तर सिदलीबाईचा जीव वाचला असता – वाघ
- मुख्यमंत्र्यांचे ‘खास’ नार्वेकर यांचा बंगला तोडला, आता परब आणि सरनाईक यांचा नंबर – सोमय्या
- पुरुषप्रधान संस्कृती मागे टाकत ५ मुलींनी आपल्या आईच्या पार्थिवाला दिला खांदा
- ‘न सांगताही नांदेडमध्ये हजारो लोक जमा झाले, सांगून बघू का?’ मग बघा!
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत – सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
