🕒 1 min read
औरंगाबाद : येणारे दोन दिवस ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. आता येणाऱ्या काळात पुन्हा एकदा वरूणराजा जोरदार बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपंचमी, बैल पोळा, गणेशोत्सवादरम्यान पाऊस जोरदार हजेरी लावत असतो. यंदाही नागपंचमी सण होताच दोन तीन दिवस सलग पावसाने हजेरी लावली होती. तसेच पुढे बैलपोळा, गणेशोत्सव दरम्यान पाऊस हजेरी लावेल की काय? अशी देखील शक्यता सध्या वर्तविली जात आहे. यंदा नागपंचमी सण होताच पावसाने औरंगाबादमध्ये हजेरी लावली होती. २१ ऑगस्टपर्यंत मात्र पाऊस गायब झाल्याचे दिसून आले.
असे असले तरी आता मराठवाड्यात मंगळवारी (दि.३१) आणि बुधवारी (दि.१) या दोन दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे. विदर्भात पाऊस कमी पडण्याची शक्यता दिसते असेही औंधकर यांनी सांगितले. याशिवाय परतीचा पाऊस म्हणत असाल तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर परतीचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डेल्टा विषाणूच्या विरोधात ‘ही’ लस ठरणार गेम चेंजर
- पुढील ३-४ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता
- ‘मी काय म्हणतो साहेब CBI प्रमाणेच ED लाही राज्यात तपास कराया बंदी घाला, लैच सालटवत्यात’
- ‘महाविकास आघाडीच्या बेफिकिरीमुळेच ओबीसींचे नुकसान’, खा.प्रीतम मुंडेंचा आरोप
- ‘भाजपा नेतेच कोरोनाचे कॅरिअर, जनतेने त्यांच्यापासून दूर रहावे,’ कॉंग्रेसचा टोला

