Share

‘राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील’, सदाभाऊ खोत यांचा विश्वास

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे चार दिवसीय नाशिक शहराच्या दौऱ्यावर आहेत. ते पक्षाच्या ‘शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा’ या उपक्रमांतर्गत विविध शाखांना भेट देत आहेत. यातून ते शाखा प्रमुख व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. त्यातून आगामी राजकीय वाटचालीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सूचना नोंदवून घेत आहेत.

आज मनसेच्या बैठकीपूर्वी अमित ठाकरे आणि रयत क्रांती संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची भेट झाली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. ‘राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील’ असा विश्वास यावेळी सदाभाऊंनी व्यक्त केला. सदाभाऊ खोत सध्या शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत नाशिक दौरा करत आहेत. तर अमित ठाकरेही तिथेच आहेत. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवला
कोणतेही सरकार हे कायमस्वरूपी नसते, कोण काम करत आहे आणि कोण नाही हे लोक पाहत असतात. ते तेवढे सूज्ञ असतात,’ अशा सूचक शब्दांत अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर शुक्रवारी टीका केली. नाशिकमधून थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल करीत अमित यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवला. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून आम्हाला येथे पुन्हा सत्ता मिळवायची आहे. मनसेच्या काळात झालेली कामे व सध्या होत असलेली कामे लोकांसमोर आहेत. नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न मनसेने सोडवला. सत्तेत आल्यावर उर्वरित कामे करू, अशी ग्वाही अमित यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!