🕒 1 min read
मुंबई : स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसह राज्याला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, ‘कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुया. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांची थोडी गफलत झाली. देश स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी लगेचच त्यांच्यामागे अभे असलेले राज्याचे मुख्य सचिव सिताराम खुंटे यांनी अमृत महोत्सवी असं म्हटलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी चूक दुरुस्त केली. मात्र यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. ‘अभ्यासू, विचारी, संयमी आणि ब्येष्ट…’ असं कॅप्शन देत भातखळकर यांनी व्हिडीओ ट्विट केला आहे.
अभ्यासू, विचारी, संयमी आणि ब्येष्ट… pic.twitter.com/ft06asC8F9
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 15, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणात नेमकं काय काय म्हटलं ?
केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवत आहोत. आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून आपण सर्वांना काळजी घ्यायची आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता साथ आटोक्यात असली तरी आपल्याला अजूनही संपूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे. ऑक्सीजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत. पण तरीही आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ऑक्सीजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे यापुढेही कटाक्षाने पालन करावे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केला. अनेकांना कोरोनाची बाधा झाली. यात अनेकजण बरे झाले तर काही जणांना दुर्देवाने प्राण गमवावे लागले. या कोरोनाविरांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्यात लसीकरणाने आता वेग घेतला आहे. कालच साडेनऊ लाख नागरिकांचे लसीकरण करून आपण देशात उच्चांक गाठला आहे, असे त्यांनी सांगितले.
आपल्याला स्वातंत्र्य असेच नाही मिळाले, अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. यानिमित्ताने मी माझा देश, राज्य कोरोनापासून मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार असा निश्चय करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यामधील सर्व यंत्रणा सज्ज – पालकमंत्री सुभाष देसाई
- ‘…तर ते थांबलच पाहिजे’; गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- ‘युवकांना सत्तापिपासूंच्या छाताडावर उभं राहून ‘सत्यमेव जयते’चा नारा बुलंद करण्याचे बळ मिळावे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
