Share

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यामधील सर्व यंत्रणा सज्ज – पालकमंत्री सुभाष देसाई

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ई-पीक पाहणी, स्मार्ट सिटी प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, पाणी पुरवठा प्रकल्प योजना, अशा सर्व उपकमांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी झालेली आहे. यासह अनेक नवनविन योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याने उत्तरोत्तर विकास साध्य करावा अशा शुभेच्छा स्वातंत्र्यदिना निमित्त पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणा तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत. घाटीमध्ये कोविड रुग्णसेवेकरीता ८५० ऑक्सिजन बेड, १५० आयसीयू बेड तर ११० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सध्या २ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. तालुकास्तरावर ३३ कोविड केअर सेंटर तर ग्रामीण भागात गंभीर रुग्णांसाठी २५ डीसीएचसी सुरू करण्यात आलेल्या आहेत.

मनपाने तयार केलेले ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे ॲप तर देशभरात अनुकरणीय ठरले आहे. पोस्ट कोविड होम आयसोलेशन मधील रुग्णांच्या पाठपुराव्यासाठी कॉल सेंटर कार्यरत आहे. मनपाचे बालरोग कोविडसाठी एमजीएम स्पोर्टस, गरवारे स्टेडियम, मेल्ट्रॉन डिसीएचसी येथे उपलब्ध असून मातृत्व कोविड सेंटरही सज्ज असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!