Share

डेल्टा प्लस चा जिल्ह्यात एकही रुग्ण नसताना बाजारपेठेवर वेळेचा निर्बंध का?? जिल्हा व्यापारी महासंघाचा आक्षेप

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना डेल्टा प्लस चे नवीन व्हेरीअंटचा एकही रुग्ण शहरात नाही. तरीसुद्धा शासनाने नवीन नियमावली लागू करत बाजारपेठेच्या वेळा कमी केल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे व्यापारी व व्यापार्यावर अवलंबून असणारे कर्मचारी व त्यांचे कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. शासनाकडूनही व्यापाऱ्यांसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज मिळत नाही.

यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबत चर्चा करून व्यापाऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या तसेच शहरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती आटोक्यात असून शहरातील बाजारपेठेवर वेळेबाबत घातलेले निर्बंध शिथिल करून सकाळी सात ते रात्री सात पर्यंत ची वेळ निश्चित करण्यात यावी.

सोमवार ते रविवार पर्यंत बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात यावी औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी असून शनिवार-रविवार बाजारपेठ बंद असल्यास चुकीचा संदेश जात आहे. अशा प्रकारच्या मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी तुपे यांच्याशी चर्चा करून मुंबईला गेल्यानंतर व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सुचक वक्तव्य याप्रसंगी केले व व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही केला.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे ,सचिव लक्ष्मी नारायण राठी, अजय शहा, प्रफुल मालानी, तनसुख झांबड, जयंत देवळानकर, सरदार हरी सिंग, गुलाम हक्कानी, संतोष कावळे, स्वामी व इतर व्यापारी हजर होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!