Share

औरंगाबादची चिंता वाढली, ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा वाढ

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या कमी झालेली नसल्यामुळे ग्रामीण भागातील नियम अद्याप पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाही. मात्र, दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागात लवकरच तसा निर्णय घेण्यात येईल असे वाटत होते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होतांना दिसत आहे.

काही दिवसात औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रातील नव्याने समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या ५० च्या खाली गेली आहे. तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्या १०० च्या खाली आली होती. मात्र, शुक्रवारी औरंगाबाद ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा एकदा किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण मधील शुक्रवारी नव्याने १११ रुग्णांच भर पडलीय. त्यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडलीय.

जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी २०३ जणांना (मनपा २५, ग्रामीण १७८) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १४०८०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण १३० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४५२६४ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३३७२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १०९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील ४ मृत्यू घाटीमधील आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!