औरंगाबाद : राज्य सरकार प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवत आहे. प्रत्येक प्रश्न केंद्राने साडवावा असे राज्य सरकारला वाटत आहे. प्रत्येक विकासाच्या कामासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली जात आहे. सर्वच केंद्र सरकारने करावे असे ठाकरे सरकारला वाटत आहे. इतकेच असेल तर राज्य सरकार केंद्रला भाड्याने चालवायला द्या, असा खोचक सल्ला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीड संदर्भात आमदार लोणीकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणतेही काम करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही, असे म्हणत आहे. अर्थमंत्र्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीत पैसा जमा करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
राज्याच्या तिजोरीत पैसा जमा करण्याचे कौशल्य अर्थमंत्र्यांचे असते. त्यांना ते काम जमत नसेल तर केंद्रालाच राज्य चालवू द्या, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार एकामागे एक अपराध करत आहेत. शिशुपालाचे १०० अपराध भरल्याशिवाय त्याला शिक्षा करता येत नाही. आता या सरकारचे १०० अपराध झाले असल्याचेही लोणीकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील ‘या’ शहरात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही मिळणार लस
- ‘राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही’; राजेश टोपेंच विधान
- ‘मोदी आता वाराणसीलाही व्हेनिस बनवल्याचा दावा करतील!’
- ‘अजितदादा सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात, हे मी भाजपचा असून मान्य करतो’
- जुलै महिन्यात जनशताब्दी, नंदिग्राम एक्सप्रेस धावण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
