Share

‘अशोक चव्हाणांनी जनहिताचे कामे करावीत’, खा.चिखलीकरांचा टोला

Published On: 

नांदेड : आपला मतदारसंघ अबाधित ठेऊन दुसऱ्याच्या मतदारसंघाला दुर्लक्षित करणारे नेते होऊ शकत नाही. फक्त भोकर मतदारसंघाला १०० टक्के पीक विमा मिळतो तर इतर मतदारसंघांना का मिळत नाही, पालकमंत्र्यांनी मतदारसंघापुरते मर्यादित न राहता काम केले तर जनहित होईल, असा टोला भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना लगावला.

खा.चिखलीकर यांचा किनवट नगर परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. खा.चिखलीकर यांनी पालकमंत्र्यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘त्यांना विकासकामे करण्यासाठी किनवट दिसत नाही तर निवडणुकी पुरते ते किनवटकडे लक्ष देतात. कारण लातूर जिल्ह्यात २३ विविध विभागीय कार्यालये आहेत तर नांदेड जिल्ह्यात फक्त तीन ठिकाणी विभागीय कार्यालय आहे तर किनवट हा तालुका १५० किमी अंतरावर असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले’.

राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता खा.चिखलीकर म्हणाले की, नियोजित आराखड्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे काम होत नाही. किनवट शहरातच कसा ईको झोन लागतो, इको झोनच्या नावाखाली शहरातच १८ मीटर रुंद रस्ता होत आहे. याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन चौकशी करण्यास भाग पाडू असे चिखलीकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!