🕒 1 min read
वैजापूर : गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असतांना विमा कंपनीने केवळ कपाशी, मुग व कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तसेच मंजुर विमा रक्कमही अतिशय तोकडी आहे. याप्रकरणी चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपाच्या वैजापूर तालुका शाखेने उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना केली आहे.
२०२०-२१ च्या खरीप हंगामात तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कांदा, मुग, कपाशी या पिकांसोबतच मका, तुर, सोयाबीन या खरीप पिकांचेही नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांना विमा कंपनीने केवळ कांदा, मुग व कपाशी या तीन पिकांसाठीच विमा मंजुर केला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, उद्योग आघाडीचे कैलास पवार, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी शेतकऱ्यांच्या वतिने उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
याशिवाय तालुक्यातील महालगाव व वांजरगाव मंडलात अतिवृष्टी झाल्याचा अहवाल असतांना शेतकऱ्यांना कमी पिक विमा मंजुर झाला आहे. काही मंडळात नुकसान होऊनही भरलेल्या रकमेइतकी रक्कम मंजुर नाही असे निवेदनात म्हटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कर्ज काढून लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे अनेकांचे उभे शेत वाया गेले. विमा कंपन्यांनी देखील काही पिकांसाठी नकार दिल्याने आता आम्ही काय करावे? कुणा पुढे हात पसरावे असा सवाल शेतकरी वर्गाने उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी भाजपने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा अन् फडणवीसांनी केला ‘त्या’ विधानाचा पुनरुच्चार
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- नारायण राणेंनी संभाजीराजेंवर केलेली टीका योग्य नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
