औरंगाबाद : कोरोना संसर्गातून बरे झालेल्या बहुसंख्य रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. सध्या औरंगाबाद शहरातील १४ रुग्णालयांमध्ये ३११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.यात सर्वाधिक ८० रुग्ण घाटी रुग्णालयात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. औरंगाबाद शहरात व मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वर्षभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरु असून त्यात आता कोरोनातून परतल्यावरही अनेकांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. या इन्फेक्शनमुळे अनेकांना आपला डोळा गमवावा लागत आहे. काही जणांवर शस्त्रक्रिया करून जबडा काढून टाकला आहे.
शहरातील १४ रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यात शहरातीलच नव्हे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णांनाही समावेश आहे. म्युकरमायकोसिसचे गंभीर स्वरुप पाहता महापालिकेकडून सर्व हॉस्पिटल कडून नियमित अहवाल मागविला जातो. गुरुवारच्या अहवालानुसार १४ हॉस्पिटलमध्ये एकुण ३११ रुग्ण उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस या आजारात ४० ते ६० या वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे.
घाटीत ८० रुग्णांवर उपचार सुरु असून यात दोन तरुणांचा समावेश आहे. कोरोनानंतर शहरात म्युकरमायकोसिसने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. यात कोरोनानंतर, डायबिटिस असलेले रुग्ण, स्टेरॉइड्च्या जास्त वापरामुळे, ऑक्सिजन बाटल्यांमध्ये डिस्टिल्ड वॉटर वापरण्याकडे दुर्लक्ष यामुळे म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. प्रकृती गंभीर असलेले कोरोना रुग्ण अनेक दिवस रुग्णालयात असतात. अशावेळी त्यांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस जास्त पसरू नये म्हणून रुग्णांना इंजेक्शन दिले जाते. रुग्णांचा बचाव होईल या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे, तज्ज्ञांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- सोमवारपासून दिल्लीत ‘अनलाॅक’ ; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा मोठा निर्णय
- अखेर स्मार्ट सिटी बसला मिळाला मोबदला, १ कोटी ७० लाख आले, ८ लाख बाकी!
- महापालिकेच्या दिड कोटींच्या भूखंडावरील अतिक्रमण जमीनदोस्त!
- राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही ?, जयंत पाटलांनी दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
