🕒 1 min read
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करा अशी मागणी खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव, यांनी केली आहेत. गुरूवारी दि.२२ वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.रमेश बोरनारे यांना निवेदन देत राजेंद्र जानराव यांनी ही मागणी केली.
राज्य सरकारने गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी जनतेला शिवभोजन थाळी या नावाने अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्याचा फायदा हातावर पोट असलेल्या गरीब जनतेला मोठ्या प्रमाणात होत असुन शहरात सुरु असलेल्या या योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहेत. मात्र मोठी लोकसंख्या असलेल्या गावपातळीवर ग्रामिण भागात देखील हि योजना सुरु करुण गरीब जनतेचे पोट भरावे.
खंडाळा या गावात केंद्र सुरु करुन जनतेच्या पोटाची सोय करावी, वैजापूर तालुक्यातील खंडाळा हे मोठे गाव असुन जवळजवळ २० हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथील अनेक कुटुंब हे रोजंदारीवर काम करुन आपले पोट भरतात. मात्र सध्या कोरोना संकट असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गरीब मजुर कामगारांचा पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी एक शिवभोजन केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव यांनी आ.प्रा.रमेश बोरनारे यांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ मात्र,अर्थचक्राला झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री
- ज्यादा भाडे दर आकारणार्या रुग्णवाहिकांवर परभणी आरटीओ कारवाई करणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- बीड येथे वाळू माफियांवर कारवाई; ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
