चेन्नई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीए, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.
या सामन्यात विजय मिळवत आरसीबीने सलग तिसरा सामना जिंकला आहे. आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात आरसीबीने प्रथमच स्पर्धेतील सलामीचे तीनही सामने सलग जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. आरसीबीने दिलेल्या २०५ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ १६६ धावापर्यंत मजल मारु शकला.
यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखून विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांना ६ धावांनी विजय मिळवला होता. तर रविवारी झालेल्या सामन्यात केकेआरचा ३८ धावांनी पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच हंगामातील पहिले तिन्ही सामने जिंकण्याची कामगिरी केली.
महत्वाच्या बातम्या
- देशात युद्धजन्य परिस्थिती, जनतेत संभ्रम आणि तणाव; संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी
- विराटच्या आरसीबीचा खास किर्तीमान; चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत गाठले यादीत अव्वल स्थान
- जालना जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशुकाट; वाढते तापमान, पोलिसांच्या दंडुकेमुळे नागरिक घरात
- युजवेंद्र चहल स्पर्धेतील पहिली विकेट घेताच पत्नी धनश्रीच्या डोळ्यात पाणी
- ‘बर्थ डे बॉय’ची कमाल; वाढदिवसाच्या दिवशी अर्धशतक झळकावणारा के एल राहुल पहिलाच भारतीय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
