Share

देशात युद्धजन्य परिस्थिती, जनतेत संभ्रम आणि तणाव; संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच आता कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे.

यामुळे अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांवर ताण वाढत असून बेड्स, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचं मत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच, कोरोनाच्या अभूतपूर्व स्थितीवर चर्चेसाठी संसदेचं दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी देखील राऊत यांनी केली आहे.

‘ही एक अभूतपूर्व आणि जवळजवळ युद्धासारखी परिस्थिती आहे. सगळीकडे अत्यंत गोंधळ आणि तणाव! बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसीकरण देखील नाही! हा सर्व गोंधळ असून या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी किमान दोन दिवस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं जावं, जय हिंद !’ अशी मागणी संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!