🕒 1 min read
मुंबई : सर्वसामान्य जनता करोनाच्या निर्बंधांबरोबर वाढत्या महागाईला तोंड देत असताना थकीत विज बिलासाठी मदत मिळेल अशी आशा सरकारने दाखवली. मात्र, त्यावर सरकारने घोर निराशाच केली. काही हप्ते करून विजबील भरण्यास मुभा देणे गरजेचे असताना थेट कनेक्शन कट केलं जात आहे. तर दुसरीकडे मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपने केला होता.
यावर आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलेले आहे. ते म्हणाले कि, ‘मला चांगले रहायला आवडते, माणसाने लॅविश राहू नये का? मी कोणतेही नियमबाह्य काम केलं नसून गेले वर्षभर मी भाड्याच्या घरी राहत होतो.’
पुढे ते म्हणाले, ‘माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही. तर, सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे.’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
मी पायलट होतो त्यावेळी मी खर्च करु शकत असल्याने लॅविश रहायचो असं उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले… हरकत नाही पण आत्ता हा करोडोंचा खर्च तुम्ही खिशातून केलात की सरकारी तिजोरीतून केलात एवढंच सांगा… pic.twitter.com/zBoC2Kqk36
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 19, 2021
नितीन राऊत यांच्या या स्पष्टीकरणावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य करत हा खर्च स्वतःच्या खिशातून आहे की सरकारी तिजोरीतून होत आहे ? असा सवाल केला आहे. ‘मी पायलट होतो त्यावेळी मी खर्च करु शकत असल्याने लॅविश रहायचो असं उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले… हरकत नाही पण आत्ता हा करोडोंचा खर्च तुम्ही खिशातून केलात की सरकारी तिजोरीतून केलात एवढंच सांगा…’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतो पण ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यालय व घराचे सुशोभीकरण करताना सढळ हाताने पैसा खर्च केला जातो… जनतेला भरमसाठ वाढीव बिले यासाठीच पाठविली आहेत का? @NitinRaut_INC pic.twitter.com/ra5zRYEIkO
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 19, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- मनपाचा जीव भांड्यात पडला! केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवणे म्हणजे अत्याचार नव्हे
- अंबाबाईच्या मंदिरात संध्याकाळी सहानंतर प्रवेश मिळणार नाही
- ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, कोरोनाबाबतचे अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले
- स्त्रीची प्रतिष्ठा राखणे हे राष्ट्राचे कर्तव्य; न्यायालयाच्या ‘त्या’ सल्ल्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
