🕒 1 min read
मुंबई : १५ मार्च रोजी सर्व भारतीय मीडीया आलिया भट्टचा वाढदिवस साजरा करत होती. मात्र याच दिवशी भारताने ४६ वर्षापुर्वी जिंकलेला एकमेव हॉकी विश्वचषकाची कोणाला आठवण नाही राहिली. एकीकडे आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो. पण त्याचवेळी संपुर्ण देशाला आंनदाचा आणि गौरवाचा क्षण देणाऱ्या विश्वविजयाला मात्र विसरतो, अशी खंत मेजर ध्यानचंद यांचे पुत्र आणि या संघाचे खेळाडू अशोक कुमार यांनी व्यक्त केली.
खेळाच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध झालेली किंवा भविष्यात होणारा प्रत्येक सामना हा भारत-पाकिस्तान क्रीडा रसिकासाठी धर्मयुद्धाप्रमाणे असतो. याच पाकिस्तानविरुध्द १९७५ च्या विश्वचषकातील १५ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात मेजर ध्यानचंद यांचे पुत्र आणि माजी हॉकी खेळाडू अशोक कुमार यांनी विजयी गोल नोंदवीला होता. मात्र या विश्वविजया बद्दल कोणालाही आठवण नसल्याने अशोक कुमार यांनी नाराजी व्यक्त केली.

भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशा गोलफरकाने लोळवून भारतीय हॉकी संघाने मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर येथे विश्वविजयी पताका फडकाविली होती. १५ मार्च १९७५ चा तो दिवस, या ऐतिहासिक घटनेला १५ मार्च २०२१ रोजी ४६ वर्षे झाली. हॉकीचा एकमेव विश्वचषक जिंकलेला तो दिवस दुर्दैवाने कुणाच्याही स्मरणात नाही. चाहतेदेखील त्या जेतेपदाच्या नायकांना विसरले आहेत.
विश्वविजेत्या संघाचे सदस्य अशोक दिवाण यांचे मत
‘भारताचा हा पहिलाच विश्वचषक होता. आजपर्यंत आम्ही दुसऱ्या जेतेपदाची प्रतीक्षा करीत आहोत. १५ मार्चला दरवर्षी आम्ही त्या संघातील जीवित सदस्य, तसेच हॉकी समुदायातील लोक एकमेकांचे अभिनंदन करतो. अन्य कोणाला त्या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण होत नसावे. काही देणेघेणे नाही. असेच होत राहिल्यास भावी पिढीला काही कळणार नाही.’
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये’
- ‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’
- आज इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत रंगणार ; हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; नव्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
- तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमारसाठी कोहली बलीदान करेल का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
