मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी करत आक्रमक भूमिका घेतली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले होते. तर, सबळ पुरावे असूनही महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
आता, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी देखील भाजपने असाच आकांडतांडव केला होता, मात्र सीबीआय चौकशीत पुढे काय समोर आलं ? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
‘सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणात भाजपने प्रचंड आरडाओरडा केला. हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देखील दिला. परंतु, त्याचा रिपोर्ट अद्याप सर्वसामान्यांसमोर आला नाही. भाजपने सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणावर एक संपूर्ण निवडणूक काढली. त्यामुळे सचिन वाझे प्रकरणात तरी भाजपने मुळापर्यत जावं,’ असा सल्ला देखील भाई जगताप यांनी भाजपला दिला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘राज्यात जे काही प्रकार घडत आहेत याबाबत वारंवार सरकार अस्थिर करण्यासाठी आकांडतांडव करायचं असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय असो किंवा एनआयए असो त्यांचा जो रिपोर्ट आहे. तो आता समोर आणावा,’ अशी मागणी देखील जगताप यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझेंवर कोणकोणत्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल ? घ्या जाणून !
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून अजित पवारांनी फडणवीसांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं
- आता ऑल इंडिया टुरिस्ट परमिटसाठी नवी योजना; अवघ्या ‘इतक्या’ दिवसात मिळणार हे परमिट
- ईशान किशन जे बोलला ते ऐकून विराट त्याला संघात जागा देण्याचा नक्कीच विचार करेल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
