Share

लॉकडाऊनच्या पाहणीसाठी तिनही उच्चपदस्थ अधिकारी रस्त्यावर!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन तर शनिवार रविवार कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आज (दि.१३) कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी, मनपा आणि पोलीस आयुक्त यांनी अण्णाभाऊ साठे चौक, टिव्ही सेंटर चौकात पाहणी केली. त्यानंतर तिनही अधिकारी संपूर्ण शहरात विभागले गेले.

आज कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी अण्णाभाऊ साठे चौक, टिव्ही सेंटर चौकात पाहणी केली. यावेळी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनी बाहेर फिरण्याचे कारण विचारत विचारपूस केली.

त्यानंतर तिनही अधिकारी शहरातील वेगवेगळ्या भागात विभागले गेले. मनपा आयुक्तांनी आंबेडकर चौक, सिडको बसस्थानक भागात तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधला. लॉकडाऊनचे पालन कशाप्रकारे होत आहे. याची पाहणी केली. यावेळी जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार उपस्थित होते.

शहरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावेळी घराघरात रुग्ण निघत आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

तर शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र नागरिकांकडून अजूनही कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने गुरुवारी देखील तिनही अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच चोप दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!