Share

‘रायवाडीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवावा, अन्यथा आत्मदहन’

Published On: 

लातूर : लातूरच्या रायवाडी येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा गावकऱ्यांनी वर्गणी काढून उभारला होता, परंतु प्रशासनाने कोणाचीही याबाबतीत एकही तक्रार नसताना हा पुतळा काढून टाकला. हा पुतळा पूर्ववत जागेवर बसवावा या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स मानव अधिकार मिशन यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

रायवाडी येथे सार्वजनिक वर्गणीतून २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. स्थानिक पातळीवर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून ग्रामपंचायतीमार्फत नाहरकत प्रमाणपत्र मिळाले होते. पुतळ्याबाबत कोणा व्यक्ती अथवा संघटनेची तक्रार नसताना २५ फेब्रुवारी रोजी पुतळा काढण्यात आला. गावकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा, पुतळा काढू नये अशी विनंती केली.

परंतु, तहसीलदारांनी पुतळा काढण्यासाठी घाई केली. त्यांना कोणाचे आदेश होते, असे प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केले जात आहेत. या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुतळा ज्या जागेत होता, त्या ठिकाणी बसविण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!