🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला आहे. येत्या शनिवारी ऋतिक रोशनला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु तर्फे हा समन्स बजावण्यात आला आहे.
ऋतिक रोशनने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली आहे. ऋतिकच्या तक्रारी नुसार मुंबई क्राईम ब्रांच तपास करत आहे. अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत हे चांगले मित्र होते. मात्र , नंतर त्यांच्यात वाद झाल्या नंतर कंगनाने ऋतिक आपल्याला सतत इमेल पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला होता. यावेळी आपण कंगनाला कोणतेही इमेल पाठवले नसल्याचा खुलासा ऋतिकने केला होता.
यानंतर ऋतिकने त्याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर सेल कडेही तक्रार केली होती. हे सर्व प्रकरण 2016 चं आहे. ही केस आता सायबर सेलकडून सीआययुकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. आता ऋतिक रोशन याच्या तक्रारीचा नव्याने तपास सुरु झाला आहे. त्याच अनुषंगाने ऋतिकला त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये भारताने इंग्लंडला चारली धूळ !
- खरे वाघ असाल तर चित्रा वाघ यांच्यासारखे वागा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको; शेलारांचा शिवसेनेवर प्रहार
- मोठी बातमी : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीमुळे खळबळ
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
- जळकोट तालुक्याला डोंगरी तालुक्याचा दर्जा द्यावा : मंत्री संजय बनसोडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
