नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार त्यांनी केला आहे. त्या काल नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली आहे. ‘५२ लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास’ असल्याचे सुळे यांनी म्हंटलय. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी फारकत घेत भाजपवासी झालेल्या गणेश नाईक यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
‘इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असतील तर, गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा’, अशी मागणी करतानाच याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार’, आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला घाबरू नका. कुणी गुंडगिरी करत असल्यास रात्री अपरात्री कधीही मला फोन करा. केवळ इथलेच नाहीत तर इंटरनॅशनल डॉनसुद्धा मला ओळखतात. म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही’, असे विधान गणेश नाईक यांनी तुर्भे येथे एका कार्यक्रमात केले होते. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मित्रानेच दारू पाजून केला खून; लखन सोनवणेच्या मृत्यूचे रहस्य उलगडले
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
