Share

लसीचा पहिला डोस घेतलेल्या दोन डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रभावी शस्त्र म्हणून देशात कोरोना लस देण्यात येत आहे. मात्र, औरंगाबादमधील दोन डॉक्टरांना कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाला आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकरणादरम्यान लसीचा दुसरा डोस देण्यास सुरूवात झालेली असताना या वृत्तामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबादेत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली होती. यामध्ये २८ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यासही सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, असे असताना पहिला डोस घेतलेल्या दोन डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला आहे.

या संदर्भात महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. त्यांच्यानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी शरीरात अँटिबॉडी तयार होतात. त्यात ज्या डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला आहे, त्यांच्यामध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत. यावरून त्यांच्यावर लसीचा परिणाम झाला असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोणतीही शंका न बाळगता सर्वांनी कोरोना लस घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!