Share

‘पूजा चव्हाणची हत्त्या झाली, त्यासाठी ठाकरे सरकारचे मंत्री जबाबदार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे.

या सर्व आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, विरोधी पक्ष भाजप कडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर अखेर संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे. पूजा चव्हाणची हत्त्या झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘मंत्री संजय राठोडची हकालपट्टी नव्हे अटक व्हायला हवी. पूजा चव्हाणने स्वतः जीव दिला नाही. तिची हत्त्या झाली आहे. त्यासाठी ठाकरे सरकारचे मंत्री जबाबदार आहेत’, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!