Share

समाजातील वचिंत आणि दिव्यांगांना डावलून विकास होऊ शकत नाही : अशोक चव्हाण

Published On: 

नांदेड : दिव्यांगांचे प्रश्न आव्हानात्मक जरी असले तरी त्याच्यांत तसूभरही आत्मविश्वासाची कमतरता नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या मागण्या, अपेक्षा असतील तर शासनाने प्राधान्याने पूर्ण केल्या पाहिजे, असे ते म्हणाले. कौठा ओम गार्डन येथे दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरण वितरण समारंभात ते बोलत होते.

सामजिक न्याय व अधिकारिता विभागाच्यावतीने एडिप व राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत या उपरणांचे वाटप करण्यात आले होते. या समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारीता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मुख्य अतिथी म्हणूण उपस्थिती लावली होती. जिल्हास्तरावर न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवनही उभारले आहे. या भवनात दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करू. त्या कक्षात त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकिय योजनांचा लाभ घेता येईल, असे आश्वासन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

या भवनासाठी केंद्र सरकारने राज्य शासनाला सोबत घेऊन पुढाकार घ्यावा अशी विनंती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गोहलोत यांना केली. दिव्यांगाच्या विविध योजनांचे अतिशय चागंले काम महाराष्ट्र शासन करत आहे असा गौरव केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणात केला

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!