🕒 1 min read
मुंबई:- बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले? कोरोना लस सर्वांना मोफत मिळाली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारचे काय धोरण आहे ते लवकर स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सर्वपक्षिय नेत्यांबरोबर कोरोना लसीबाबत चर्चा केली होती. त्यात त्यांनी काही आठवड्यातच कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर मलिक बोलत होते.
केंद्र आणि राज्य सरकार चर्चा करून कोरोना लसीची किंमत ठरवेल, असे पंतप्रधानानी सांगितले होते. म्हणजे केंद्र सरकारला जनतेकडून पैसे उकळायचे आहेत का, असा सवाल मलिक यांनी केला आहे. कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही बाब चांगली आहे. मात्र, ती मोफतच मिळाली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला संबोधित करताना त्यांनी सांगितले, की येत्या काही आठवड्यांमध्येच कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. यासोबतच, देशात लसीकरण करताना वयोवृद्धांना प्राधान्य देण्याचा विचार सरकार करत असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाच्या लढाईत आपण नक्कीच जिंकू शकतो. संपूर्ण देशाच्या लसीकरणासाठी आपल्याकडे अनुभवी नेटवर्क उपलब्ध आहे. येत्या काही आठवड्यांमध्येच ही लस उपलब्ध होईल. यावर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये देशात अत्यंत भीतीचे वातावरण होते. मात्र, आता डिसेंबरमध्ये पाहिले तर, भविष्य अत्यंत आशादायी दिसत आहे, असे मोदी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- येडीयुरप्पांच्या ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापनेविरोधात कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंद !
- यापुढे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं; प्राजक्त तनपुरेंचा भाजप नेत्यांना टोला
- तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमधील ‘या’ महत्वाच्या व्यक्तीने जीवन संपवले
- दोन दिवसाचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही,नानांचा सरकारला घरचा आहेर

