🕒 1 min read
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या लेखकाने आपले आयुष्य संपवले. राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या हाती सुसाइडनोट सापडली. आपण आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचं त्याने नोटच्या माध्यमातून सांगितले. मात्र तो सायबर फसवणूकीचा आणि ब्लॅकमेलचा शिकार झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.
शिवाय अभिषेकला सतत फोनवरून धमक्या मिळत असल्याचा दावा देखील त्याच्या कुटुंबीयांनी केला. अभिषेकने घेतलेले कर्ज परत करण्यासाठी दबाव निर्माण केला जात होता, असं देखील त्याच्या भावाने सांगितले आहे. भावाच्या मृत्यूनंतर मी त्याचा मेल तपासून पाहिला त्याला वेग-वेगळ्या नंबरवरून फोन येत होते.
‘इजी लोन’ ऍपच्या माध्यमातून अभिषेकने कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परतफेडीची रक्कम अधिक होती. शिवाय अभिषेकने ज्या ऍपद्वारे कर्ज घेतले होते तो ऍप ऑनलाइन सायबर घोटाळ्यात सामील असल्याचं अभिषेकच्या भावाने सांगितले आहे. अभिषेकला बांगलादेश, म्यानमार आणि उर्वरित भारतातील वेगवेगळ्या राज्यातून फोन येत होते. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का’; राणेंचा दादांना टोला
- टीम इंडियाच्या गब्बरचा आज जन्मदिवस
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- अन्वय नाईकप्रकरणी अर्णबच्या अडचणीत वाढ! रायगड पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
- तृप्ती देसाईंनी शिर्डीत स्टंटबाजी केल्यास काळे फासणार; शिवसेना महिला आघाडी आक्रमक


