Share

Russia Ukraine war: युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास ४ भारतीय मंत्री युरोपमध्ये रवाना होणार

Published On: 

नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात रशिया विरुद्ध युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) लष्करी आघाडीत सहभागी होऊ नये म्हणून रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. या रशिया विरुद्ध युक्रेन युद्धामुळे जगातील सर्वच देशांवर परिणाम झाले आहेत. भारत देशातील अनेक विद्यार्थी युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षण घ्यायला गेले आहेत. परंतु रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे हे भारतीय मोठ्या प्रमाणात युक्रेन देशात अडकले आहेत.

या भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. काही विद्यार्थी ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात परत सुद्धा आले आहेत. त्यातच आज आता ही मोहीम अधिक जलदगतीनं राबविण्यासाठी मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार आहेत. आज भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याबैठकीत भारत सरकारमधील ४ मंत्री युक्रेनच्या शेजारी देशात जाणार आहेत. हे चार मंत्री उरलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आण्यासाठी समन्वय साधण्याचे काम करणार आहेत.

या चार मंत्रिगटात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी समन्वय कार्यासाठी जाणार आहेत. युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी मदत करणार आहे अशी ग्वाही आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!