मुंबई: आयपीएलच्या शेवटच्या दोन मोसमात पंजाब किंग्सचे नेतृत्व केल्यानंतर, भारताचा फलंदाज केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्ससोबत कर्णधार म्हणून नवीन प्रवास सुरु करणार आहे. आरसीबीचा भाग राहिलेल्या के एल राहुल बद्दल विराट कोहलीने खुलासा केला आहे. त्याने आरसीबी मध्ये के एल कसा होता याबाबत सांगितले आहे.
राहुलच्या (KL Rahul) प्रवासावर बोलताना विराट (virat kohli) म्हणाला की “केएल राहुल २०१३ मध्ये करुण नायर आणि मयंक अग्रवालसोबत आरसीबीमध्ये होता. केएल राहुलकडे कधीही टी-२० स्पेशालिस्ट म्हणून पाहिले गेले नव्हते. आरसीबी सोडल्यापासून मी केएलला फारसे पाहिले नव्हते आणि मी ऐकले होते की तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तो आरसीबीमध्ये असताना खूपच लहान होता आणि मी आधीच भारताकडून खेळत होतो आणि आम्ही नियमितपणे आरसीबीसाठी (RCB) खेळत होतो.. त्यामुळे, आम्ही कधीच खूप लवकर कनेक्ट झालो नाही.”
के एल राहुलने याआधी खराब कामगिरीच्या वेळी विराटने साथ दिल्याचे सांगितले होते. विराटनेही यावेळी के एलच्या २०१४ मधील कामगिरी बद्दल सांगितले आहे. “२०१४ मध्ये जेव्हा त्याने कसोटी पदार्पण केले तेव्हा मी त्याला ऑस्ट्रेलियात खेळताना पाहिले होते आणि मला असे वाटले, ‘वाह! त्याने आपल्या खेळावर गंभीरपणे काही काम केले आहे. तो एक अप्रतिम खेळाडू म्हणून परतला आणि त्याने ऑस्ट्रेलियात खूप दमदार सुरुवात केली.त्याच्या देहबोलीने, आत्मविश्वासाने, वागण्याने मी खूप प्रभावित झालो होतो.”
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
- बुमराहने सांगितली मुंबईतील सुरुवातीच्या दिवसाची आठवण म्हणाला “मी पॉंटिंगला …”
- “…पैकी फक्त ९०० विद्यार्थी परतले; केंद्राने फार मोठा तीर मारला नाही”, वडेट्टीवारांची टीका
- युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना नवनीत रणांचे आवाहन
- ‘मागासवर्गीय आयोग असताना दूसरा आयोग नेमता येत नाही’ – माजी खासदार हरिभाऊ राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

