मुंबई – भाजपवाले आत्मनिर्भर होणारच…पंतप्रधानही आत्मनिर्भर होणारच…त्यांची ती घोषणाच आहे. सवाल हा आहे की, अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रसरकारला केला आहे.
जो महाराष्ट्र वर्षभरात १ लाख ९० हजार कोटी जीएसटी देतो त्या महाराष्ट्राला काय मिळाले. ज्याठिकाणी निवडणूका आहे त्याठिकाणी २५ हजार कोटी… ३५ हजार कोटी… महाराष्ट्राला काय दिले… या महाराष्ट्रात संपूर्ण भारत राहतो परंतु देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसला नाही असा जोरदार हल्ला छगन भुजबळ यांनी केला.
ज्या राज्यात निवडणूका आहेत त्या राज्यात म्हणूनच अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. परंतु हेही मिळताना कठीण आहे. त्यासाठी बिहारची निवडणूक आठवा… १० हजार कोटी… २० हजार कोटी… दीड लाख कोटी जाहीर झाले ते मिळाले का? निवडणूक संपली सगळं खतम असे सांगतानाच ३५ हजार… ६५ हजार कोटी रुपये निवडणूकपूर्वी खर्च होणार आहे का? असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अधिकाऱ्यांनो गांभीर्याने कामे करा… धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना तंबी!
- ‘तिजोरीत खडखडाट असतानाही शेतकऱ्याला आमच्या सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केली’
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
