🕒 1 min read
मुंबई : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे. भारताने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताकडून सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर सामनावीर ठरलेल्या भुवनेश्वर कुमारने २२ धावात ४ गडी बाद केले होते. मात्र सामनाविराचा खरा मानकरी हा सुर्यकुमार यादव हा होता असे वक्तव्य भारताचा माजी गोलंदाज झहिर खानने म्हणले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे. यावेळी झहीर म्हणाला, ‘ज्या खेळपट्टीवर सामना झाला ती खेळपट्टी ही फलंदाजीसाठी सोपी नव्हती. त्यामुळे सुर्यकुमार यादव हा खरा सामनावीराचा मानकरी होता.’
या डावात सुर्यकुमारने सर्वात कमी डॉट चेंडु खेळला असेही झहिर खान यावेळी म्हणला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३८ धावांनी मात केली. यापुर्वी श्रीलंकेविरुद्धच्या झालेल्या एकदिवसीय मालिकेत सुर्यकुमार यादवने पदार्पण केले होते. पहिलीच एकदिवसीय मालिका खेळणाऱ्या सुर्यकुमार यादवने मालिकावीराचा मान पटकावला. आता त्याची निवड इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
- ‘त्यांचे बोलणे कठोर आहे, गैरसमज करू नका’ भास्कर जाधवांनी अरेरावी केल्यानंतर महिलेची प्रतिक्रिया
- पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
